Skip to main content

Teacher's Day...आयुष्याच गणित

गुरू शिकविता........
 ।।रंगसंगती...
घे रंग भरुनी आयुषाच्या सारिपाटावर।।

गुरू शिकविता.....
।।गायन,वादन...
सूर घे जिव्हाळ्याचे साऱ्या घेऊन।

गुरू शिकविता......
।।इतिहास,भूगोल... 
नकोस विसरू कोणाचे ऋण, 
अवतीभवती चे हे जग सुंदर।।

गुरू शिकविता......
भाषा मराठी आणि शास्त्र...
घे वसा मायबोलीचा,
कर नाव उज्वल
करून प्रयोग विज्ञानाचा

गुरू शिकविता......
।बेरीज,वजाबाकी...ने सांगड  घाल आयुष्याची ।।
।।कर दुःखाचा भार कमी ...करून भागाकार,,,
 द्विगुणित होण्या आनंदाचा ...कर गुणाकार।।

।।ज्यास उमगले  जीवनाचे हे समीकरण।।
।।सुखी जाहला तो या जगण्यातून।।
🙏🙏🙏🙏🙏

Comments

  1. *सात किंमती रत्न पाठवित आहे..*

    *🍁💥 पहिले रत्न 💥🍁*
    💫 *माफी* 💫
    तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने 'माफ' करा.

    *🍀💥 दुसरे रत्न 💥🍀*
    💫 *विसरा* 💫
    दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा.

    *‼️🎄तिसरे रत्न 🎄‼️*
    💫 *विश्वास* 💫
    नेहमी 'स्वकष्ट' आणि 'ईश्वरावर' अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.

    *💥 चौथे रत्न* 💥
    💫 *नातं* 💫
    समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या
    मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं
    नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका,

    *💥 पाचवे रत्न* 💥
    💫 *दान* 💫
    नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही उलट दान केल्याने मिळतो मान आपले मनच
    आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं

    *💥 सहावे रत्न* 💥
    💫 *आरोग्य* 💫
    दररोज व्यायाम करा, योगासने करा, झुंबा करा,
    चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा

    *💥 सातवे रत्न* 💥
    💫 *वैराग्य* 💫
    नेहमी लक्षात ठेवा की, *'जन्म' आणि 'मरण'* कधीच कुणालाच चुकलेले नाही. *'जन्म'* घेतला म्हणजे *'मृत्यु'* अटळ आहे. *वर्तमानात* जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित बसू नका. *'जीवन' खूप सुंदर आहे, आनंदाने जगा..*.🌸🙏🏻🌸 🌹 *माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.*
    *निसर्गाची ताकद आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.*

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...