Skip to main content

Shambhar varsha purvi....


आज  जाहली  100वर्षे  पूर्ण 
अनंतात विलीन होऊन.....
नांव असे स्वातंत्र्यविराचे
"केशव गंगाधर टिळक"
किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन.....

रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका..
चिखली गावात जन्म घेतला
गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी.....
लहानपणी अन्याय सहन न करणे 
आणि कुशाग्र बुद्धी...

"मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत

लहान वयात हरपले 
 मातेचे छाया छत्र.....
वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले
दहा वर्षाच्या तापीबाई समवेत
पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र...

पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे..
संस्कृत आणि गणित विषय आवडणे....
काही दिवस शिक्षकी पेशा 
पैशासाठी निवडणे...

B.A. , L L B पदवी घेता
जागी झाली देशभक्ती....
इंग्रज सरकार राज्य खुपू लागले
वाटू लागले का असावी अशी ही सक्ती....

घेतला वसा स्वातंत्र्याचा
सामान्य लोका समजावे म्हणून.....
 केली उभारणी शाळा,कॉलेजची
परखड पणे मते मांडली 
मराठा व केसरी वृत्तपत्रातून.....

समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र
देशप्रेम,स्वतंत्र म्हणजे काय कळावं
दिले त्यांनी दोन उत्सव .....
एक शिवजयंती आणि दुसरा गणेशोत्सव

सरकार विरोधात उठविला आवाज,
लिखाण खूप केले
म्हणोनी झाला तुरुंगवास....
"मंडाले" इथे लिहला 
कर्मावर "गीतारहस्य" स्वअक्षरात....

आयुष्याच्या शेवटी
अनेक रोगांनी त्यांना जवळ केले
आणि ........
1ऑगस्ट 1920 रोजी...
 लोकमान्य म्हणून पदवी
मिळालेल्या.....
एका तेजस्वी पुरुषाने ......
या इहलोकीची निरोप घेतला.
🙏🙏


आज शंभर वर्ष झाली तरी,
त्या व्यक्तीला आपण विसरू शकलो नाही.
त्यावेळची परिस्थिती उसत्व साजरी करणे गरजेचे होते...
 आजच्या स्थितीच्या गरजेनुसार
गणेशोत्सव कशा पद्धतीने करावा
हे आपण ठरवलं पाहिजे.

Comments

  1. Kharay aaplyala kalachi garaj samazli pahije. Chaan lekh

    ReplyDelete
  2. मस्त एका महान व्यक्तिमत्वाचा सगळा प्रवास छान मांडला आहे.

    ReplyDelete
  3. Khup surekh lekh .
    Mahan vyakti baddal aapan lihu thevadhe thodech aahe 🙏🙏

    ReplyDelete
  4. Apratim likhaan Manisha Tai......Kharya arthane Tejasvi purush" Lokmanya Tilak" 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...