Skip to main content

एक झाड आनंदाचे🌳

एक राज्य होत.....
राजा राणी आपल्या प्रजेची खूप काळजी घेत होते.  
प्रेमाने आणि जबाबदारीने .
त्यामुळे प्रजा एकदम सुखी होती.

राज्यात एक आनंदाचा झाड होत.🌳

त्या राज्यातील प्रजेनीच ते झाड लावलं होत.

फक्त त्याला नियम असा होता की,
 प्रत्येक घरातील कुणीतरी
 विहिरीवरून पाणी काढून आणायचं 
आणि झाडाला घालायचं.

 आनंदाने सगळे जण करत होत आणि
 झाड आनंदाचे झाड म्हणून 
फुलत होत,वाढत होत....☺️
त्याच एक वैशिष्ठ ,अस की...
फळ आणि फुल पण एकदमच बहरत होत.

  फुलांचा गधं वेगळाच होता....🌺
फळाला एक वेगळीच गोडी होती...🍑

बघता बघता...त्या रोपट्याच रूपांतर एका भल्या मोठ्या वृक्षांत झालं.🌳🌺🍑
झाडाला विहरीवरून पाणी आणून घालण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालू होती.

थोड्या दिवसांनी
प्रजेला एकदा जाणवलं..
फुलांचा सडा पडायचा....पण
एक फुल उचल आणि त्याचा वास घेतला की त्या व्यक्तीची एक छान आठवण विसरली जात होती.🤔🤔

एक फळ खाल्लं की......
सुखाचा एक क्षण कमी होत होता...😔😔

राजा राणीच्या महालात ही बातमी गेली.
दोघांना  ही हे खरं वाटत नव्हतं...
म्हणून ते त्या झाडा पाशी पोचले.

राणीने फुल उचल.....🌺
राजानी फळ चविने खाल्लं.....🍑
काही क्षणात राणी आपली चांगली आठवण  विसरायला लागली..
अन राजाला...सुखाचा  एक क्षण 
आपल्या पासून लांब जातोय अस जाणवू लागल....

राजा राणी ला प्रजेच बोलणं
पटायला लागलं
काय करावं हे सुचेना ...मग
दवंडी पिटवण्यात आली.....🗣️
जो कोणी हे शोधेल,
त्याला बक्षीस देण्यात येईल🏅

गावात ज्या ठिकाणी विहीर होती ,तिथेच  एक साधू रहात होते.  
 ते म्हणाला मी देतो त्याच उत्तर... आणि
त्यांनी प्रजेला उद्देशून बोलायला सुरुवात केली..

"ज्या वेळी सगळ्यांनी मिळून हे रोपटं लावलं होत, ते खूप आनंदाने आणि निस्वार्थी मनाने🤗

जस...जस झाड मोठं व्हायला लागल..
त्याला फुल फळ यायला लागली....
तुमची मानसिकता बदली.....
तुम्ही पाणी घालताना मी पणाचा भाव ठेवून पाणी घालायला लागलात...
ते मी पण त्या पाण्यात उतरल....
आणि
झाडाच मूळ च बदलून गेलं....त्याचा मूळ स्वभाव तुम्ही बदलात*......

मी विहिरीवरून पाणी आणतो, 
मीच योग्य वेळी पाणी घातलं....
  कमी,जास्त... 
अशा अनेक गोष्टी घडायला लागल्या😢

 खरतर जे दान तुम्हाला निसर्गाने दिल आहे...
ऊन,वारा,पाऊस,पाणी....
किती तरी अगणित गोष्टी....
ज्या निसर्गाने तुम्हाला भरभरून दिल्या आहेत
त्याचाच तुम्ही गर्व करायला लागलात...😡
तिथेच सगळं चक्र फिरल.

🧓👴👨‍🦳👩‍🦳👨‍🦰👩‍🦰👱👨‍🦱👩‍🦱...😔
परत ही चूक होणार नाही ह्याच आश्वासन साधू ला देऊन त्या वृक्षाची माफी सर्वांनी मागितली....
अशा प्रकारे ते झाड परत एकदा आनंदाचे झाड म्हणून ,सगळी कडे त्याची ख्याती पसरली
ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.

 🌳निसर्गाने जे दिलंय त्यासाठी आभार🌳
 
एक आनंदाचे झाड आपल्या प्रत्येकाच्या
 अंगणात किंवा मनात नक्की वाढवू.

Comments

  1. Khupch chan nakkich asse ek zad lavle pahije

    ReplyDelete
  2. Yess . Sure !!
    Love respect and care mother nature 🙏

    ReplyDelete
  3. अप्रतिम !!!
    चला , झाडे लावू या !!!
    मनापासून निसर्गावर प्रेम करू या !!
    🌳🌲🌴🌳

    ReplyDelete
  4. खूप भावस्पर्शी... खूप मोठी गोष्ट... हेतू स्पष्ट असावा आणि निरंतर असावा

    ReplyDelete
  5. छान ,,, वास्तव आहे माणूस कोणतीही गोष्ट करताना अपेक्षा, मी पणा ठेवतो.

    ReplyDelete
  6. Khup chhan tai. Apratim.☝️👌

    ReplyDelete
  7. खूप सुंदर लेख वाचला

    ReplyDelete
  8. Beautiful thought Manisha Tai...👌👏👏👏👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...