Skip to main content

मृगजळ

 जे जे गुरु स्थानी आहेत त्या सर्वांना प्रथम त्रिवार वंदन।।.....🙏🙏

उपदेश देणाराच गुरू असतो  
अस नाही  तर  किती तरी वेळा आपल्या आजूबाजूला देखील, सहज मधे कोणी तरी चांगलं शिकवून जात ,सल्ला देत.
एक आधार  मिळतो ....
तो कुठल्या स्वरूपात मिळतो हे प्रत्येकाचे प्रत्येकाला च माहीत असत.....
👩‍🦰👨‍🦰
काळजी करणारे..
आपली जबाबदारी स्वीकारणारे..
आपल्या आवडी निवडी पूर्ण करणारे..
चुकलं तर वेळीच शिक्षा देणारे...
चांगलं वाईट  सांगणारे...
आपले पहिले गुरू  
*आई वडील* 
च असतात ....
👨‍🦰👩‍🦰

गर्भात असल्या पासून आई ला  बाळाची काळजी घ्यावी लागते...... आपल्या संस्कृती मधे म्हणूनच गर्भ संस्कारा ला महत्व दिलं आहे...🤰😇
मग ह्यातूनच येणाऱ्या नवीन पिढीचा विचार मनात येतो...
म्हणून...
आज मी  थोडं new generation बद्दल लिहीणार आहे....
आज काल च वातावरणच बदल आहे, 
काही  निसर्गाचे नियम बदले आहेत...
उगाचच काहीतरी वेगळ्या कल्पनेत जगतिये नाविन पिढी.
कामाचा नको एवढा ताण,
फॅशन म्हणून व्यसन केलं जातंय....
मुला मुलींनो चुकीचा मार्ग निवडताय.
मृगजळ हा शब्द कदाचित ह्या पिढीला समजणार नाही...
ही पिढी त्याच्याच मागे धावतीये.
पिच्चर मधे दाखवल्या जाणाऱ्या  ग्लॅमर चा परिणाम होतोय... 
कसे बिनधास्त पैसे उडवतात 
काय बिनधास्त राहतात...
ह्या गोष्टीचा प्रभाव पडतोय...
पण हे समजत नाही...   
ह्याच acting चे तर त्यांना पैसे मिळतात.  
स्वतःच्या आयुष्यात अगदी सहज आणि साधेपणाने राहात असतील ही actor मंडळी...
आपल्या कडे वाईट तेवढ घेतलं जातंय.😔

आपल्या आजू बाजूला काय चांगलं घडतंय ते बघा...
खूप सकारात्मक गोष्टी आहेत घेण्यासारख्या.
चांगल ऐकू शकता,🎶
वाचू शकता.📖

स्वताच भल कशात आहे हे समजून घ्या....
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कधी जाऊ नका
कारण
प्रवाह आणि दिशा ह्या कधीच बदलत नाहीत

Comments

  1. सुंदर लिखाण.

    ReplyDelete
  2. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

    ReplyDelete
  3. Write up is good but need more examples to impress your views.

    ReplyDelete
    Replies
    1. Okk, thanks... तुमच्या सजेशन बद्दल, मला अजून दोन,तीन parents नी पर्सनल मेसेज केलाय ह्या विषयावर अजून थोडं लिही, नक्की विचार करून लिहिते.

      Delete
  4. Very true!!! Perfect Word for this Generation Mrugjal !!

    ReplyDelete
  5. AZUN VICHAR CHALALE ASATE...APURNA WATALA KUTHETARI.....

    ReplyDelete
  6. काळाप्रमाणे बदल हे होतच राहणार .नवीन पिढीला अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत ज्या पूर्वीच्या पिढीला नव्हत्या . आई वडील दोघेही नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर रहात असल्यामुळे मुलांशी संपर्क कमी झाला आहे . पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत वडीलधारी मंडळी मुलांवर लक्ष ठेवीत तीही पद्धत मोडीत निघाली आहे .

    ReplyDelete
  7. Awesome, me tumchi fan jhali

    आजच्या काळातील पिढीला संघर्ष खूप आहेत व सगळ्या गोष्टी easily accessible आहेत. मृगजळ समजेपर्यंत कधी कधी वेळ निघून गेलेली असते.

    कधी कधी मला वाटते की आपण पालक जेव्हा का चुकले व कोठे चुकले ह्याचा हिशोब करतो तेव्हा आपले ही काही तरी चुकले होते ह्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.,ब्लॉग नंबर 5 मधे अजून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे,बघू जमतंय लिहायला.

      Delete
  8. खरचं कस सांगावं या नवीन पिढी ला. आपणच दोन टोकाच्या पिढ्यांना जवळून बघतोय. म्हणून तर समजते हे मृगजळ आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...